सरकारी काम म्हटले की त्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही, अशी परिस्थिती होती. मात्र हा समज मोडीत काढत मोदी सरकारने अनेक गोष्टी जास्तीत जास्त सोप्या केल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एका मेसेजवर नागरिकांना आपले आधार कार्ड आणि पॅनकार्ड जोडून घेता येणार आहे.
आयकर विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ होण्यासाठी पॅनकार्ड आणि आधारकार्ड क्रमांकांची जोडणी उपयुक्त होणार आहे. यासाठी पॅनकार्ड आणि आधार कार्डावरील नावे समान असणे आवश्यक आहे.
दोन्ही कार्ड जोडण्यासाठी नागरीकांनी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज करायचा आहे.
याशिवाय नागरीकांना ऑनलाईनही आपल्या कागदपत्रांची जोडणी करुन घेता येणार आहे. आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवरील लिंकवरुनही हे काम करता येणार आहे. युनिक आयडेंटीफीकेशन ऑफ इंडियाकडून ही जोडणी झाल्याचे व्हेरीफीकेशन होईल. त्य़ानंतर ही जोडणी निश्चित होणार असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
आयकर विभागाकडून देण्यात येणारी ही सुविधा नागरीक आणि आयकर भरणाऱ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेमुळे अशाप्रकारची कामे तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक सोपी होणार आहेत. याचा भविष्यात चांगला फाय़दा होणार आहे. सरकारच्या २०१७ मधील अर्थविषयक कायद्यानुसार कर भरणाऱ्याला आधार कार्ड साbदर करणे बंधनकारक आहे. तसेच जुलै २०१७ पासून पॅन कार्ड काढण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने आणि अर्थिक व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता यावी यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डाची जोडणी महत्त्वाची ठरणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील ब्लॉगला भेट द्या.
http://maneshdarkunde.blogspot.in/p/blog-page_619.html?m=1
No comments:
Post a Comment